Thursday, 21 July 2016

या सुखा कारणे ...!!!

शाश्वताचा शोध घेणे हेच माणसाच्या बुध्दिचे वैशिष्ट्य आहे . चिंतनशीलता हा या विश्वाचा उगम आहे . या विश्वाला दोन टोके आहेत , एका टोकाला सर्व मानवांच्या कल्पना पलीकडे असणारे निर्गुण , निराकार ब्रम्ह आहे तर दुसऱ्या टोकाला जड आणि निर्जिव भौतिक वस्तु आहेत ...!!!
         वैदिक काळातील माणसाने अग्नी मध्ये आहुती टाकून भोग भोगण्याची ईच्छा करणे आणि एकविसाव्या शतकातील विज्ञान युगात वावरणार्या माणवाने विज्ञानाच्या साहाय्याने भोग भोगण्याची धडपड करणे , या दोन्ही मध्ये मुलतः फरक नाही . दोघेही अशाश्वताच्या क्षेत्रातच बुडी मारून जगतात . ईच्छा तृप्त करुन घेण्याचे मार्ग थोडे वेगवेगळे आहेत ईतकंच ...!!!
भौतिक सुखात केवळ रममाण न होता शाश्वत सुखावर  ( ईश्वरावर ) लक्ष केंद्रित करा असे उपनिषदकार ऋषी सांगतात ...!!!

No comments:

Post a Comment