Wednesday, 3 August 2016

हिनस्ति दुर्वृत्ति: ईति हिंदू : ।

अशी कित्येक तुफानी वादळं हिंदुस्थानी संस्कृती मध्ये गपगार झाली , निवली आणि भ्रमित होऊन गेली ....
      त्या विषयी साहित्य सम्राट भालचंद्र नेमाडे काय म्हणतात ते पाहा ...!!!

 त्रिखंडाला लगाम घालून स्वार होणार्‍या अरबी तुमानी*
हिंदुभूमीच्या कर्कवृत्तावर वाळत घातल्या गंगेत धुऊन
ठुमर्‍या गझला गात विटक्या होउन फाटल्याभक्कम स्थिरावून ठेवलेल्या उंच मशिदींच्या गिर्रेबाज घुमटांवर 
गिरकी घेऊन मऊ होणार्‍या हिंदवी वार्‍यांना कोणी चाहता नाही
दिमाखात हिंदुभूमीच्या पोटावर खूर रोवून बसलेल्या इराणी मनोर्‍यांना
उलथून टाकले तर सावरायला शहेनशहा नाहीडबेऽ छाते ऽ दुरूस्त करून लटांबर पोसणार्‍या
किरट्या छात्यांत गुरमरणार्‍या रूहूला कुराणाला कुबड्या नाहीतबहुमताचा धूर ओकू लागली हिंदुमहासागरातली बेटं तर
हजार वर्षांच्या इतिहासाची सुरळी होऊन शिरू पहाते काजीमुल्लांच्या तुमानीतगल्लीबाजारात मोकाटणार्‍या मरतुकड्या गायींच्या
नुस्त्या हुंबरण्यानं कोलमडतात
अल्पसंख्यांक अरबी घोडे खिंकाळत गावोगावआणि तोफखाने चालवीत दख्खन बेचिराख करून
मोहल्ले पक्के रोवून बसलेला मुसलमान हाज उकरीत बसतो-
शिल्लक सांभाळीत जळक्या शेवचिवड्याच्या परातीत
त्याच्या दुकानात विस्तव फक्त धुमसती राख
बंबाशिवाय विझलेली. मागचं उद्ध्वस्त दुकान
करंट्या इतिहासाचं आठ शतकांच्या
न किसी की आँख का नूर हूँ म्हणत पंचनाम्याचा वैताग सोसत.- भालचंद्र नेमाडे.