Thursday, 21 July 2016

भय ईथले संपत नाही ...!!!

विश्वामधे सर्वव्यापीपणे कार्य करणारी माया निरनिराळ्या व्यक्ती मध्ये प्रकट होते तिला अविद्या म्हणतात , अविद्या म्हणजे आत्मस्वरूपाचा , ईश्वराचा विसर होय ...!!!
देह व दृष्य जगत माणमाणसाला खरे वाटायला लागतात . अविद्या आनंदाचा लोप होय  . अज्ञानाच्या प्रेरणेने माणूस लोपलेल्या आनंदासाठी दृष्यामधे चाचपडत राहतो . ज्याच्या मध्ये जे नाही त्याच्या मध्ये ते आहे असा भ्रम होणे हा अविद्येचा प्रभाव समजावा ...!!!
       " मी आनंद स्वरूप आत्मा आहे , अर्थात आनंदाचे स्थान माझ्या तच आहे "  हे विसरून   " मी देह आहे व इंद्रियांच्या साहाय्याने मला आनंद मिळेल " या ठाम कल्पनेने वागणे ही अविद्येची करामत आहे . तिच्या अमलाखाली वावरणारा माणूस अनुभवाने शहाणा होत नाही म्हणून त्याच्या जीवनातील भय चिंता संपत नाही ...!!!
        अविद्या हा माणसाचा मुळ स्वभाव नाही . त्याला दुःख नकोच असते , त्याचा मुळ स्वभाव दुःख शुन्यच आहे . जगात घडणार्या घटनांचे आकलन तो नीटपणे करुन घेत नाही म्हणून दुःख भोगतो .  अविद्येचा नाश करणारी विद्या जरूर आहे ...!!!
      उपनिषदांमधे परा व अपरा अशा दोन विद्या सांगितल्या आहेत . विद्या ही अनुभूती मधुन येत असते . अनुभूती चे तिन प्रकार आहेत . प्रत्यक्ष , परोक्ष आणि अपरोक्ष . दृष्य  पदार्थांशी संयोग होऊन जी निर्माण होते ती प्रत्यक्ष अनुभूती . प्रत्यक्षावर संस्कार करुन बुध्दि जे अनुमान करते ती परोक्ष अनुभूती होय . विश्व रचनेचा विचार करणारी व त्या रचनेचे यथार्थ स्वरूप निश्चित करणारी अपरा विद्या प्रत्यक्ष व परोक्ष यावर अवलंबुन असते . निसर्गाचे सुक्ष्म , व्यापक व गुढ नियम ती शोधून काढते . पण तिने ही माणसाच्या ज्ञानाला पुर्णता येत नाही .
      आत्मस्वरूपात लीन होऊन , म्हणजे च स्वस्वरूपमय होऊन आत्मस्वरुपाचे ज्ञान करुन घेण्याच्या अनुभूती ला अपरोक्ष अनुभूती असे म्हणतात . हीच तीं पराविद्या , सर्व विद्यांची सम्राज्ञी ...!!!
       हीच परा विद्या जाणली असता सर्व काही जाणले जाते ...!!!

  "यस्मीन विज्ञाते सर्व विज्ञात भवती ।"

No comments:

Post a Comment